
इचलकरंजी (दि.०२) : खंडणीप्रकरणात अटकेत असलेले भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांना मोठा झटका बसला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून, आता त्यांच्या तुरुंगातील मुक्कामात आणखी वाढ होणार आहे.
विशेष म्हणजे मनोज साळुंखे यांनी या प्रकरणात दुसऱ्यांदा जमीन अर्ज केला होता मात्र फिर्यादीच्या वकिलांनी जोरदार हरकत घेतल्याने कोर्टाने साळुंखे यांचा जमीर अर्ज फेटाळला.
मनोज साळुंखे यांना काही दिवसांपूर्वी खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सुनावणीदरम्यान, फिर्यादी पक्षाने प्रतिज्ञापत्र सादर करत साळुंखेंवर पूर्वीचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद केलं. या प्रकरणाचा अध्याप तपास अपुरा आहे, त्यांना जामीन मिळाल्यास फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, अशी शक्यता मांडण्यात आली.
या युक्तिवादाचा विचार करत न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी साळुंखे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे सध्या ते तुरुंगातच राहणार आहेत.
या प्रकरणात मनोज साळुंखे यांच्यातर्फे ॲड. सचिन माने तर फिर्यादीतर्फे ॲड. एस.एस. लकडे यांनी बाजू मांडली. आता पुढील सुनावणी आणि पोलिस तपास काय वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.